नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात शेतीशी निगडित कामांना वगळण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातले निर्देश असलेलं पत्रक आज केंद्रीय गृह सचिवांनी जारी केलं.

कापणी आणि बियाणं लागवडीचा हंगाम सुरु असल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र मंडया आणि अन्य बाजार व्यवहारांना ही संचारबंदी लागू असेल, असंही या पत्रकात स्पष्ट केलं आहे.