नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनधन खात्यामध्ये जमा झालेले पाचशे रुपये काढण्यासाठी जालना शहरातल्या काही बँकांसमोर महिला गर्दी करत आहेत. जालना इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घेण्यासाठी देखील नागरिक गर्दी करत आहेत.

यामुळे भाजीपाल्याच्या ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांनीच फक्त जालना बाजार समितीच्या आवारामध्ये भाजीपाला खरेदी करावा, सामान्य नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आलं आहे.