नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोक लॉकडाऊन गांभीर्यानं घेत नसल्यानं त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात असं महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत कोरोनाच्या मुद्दावर माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

लोकांनी घरातच बसावं, असं आवाहनही त्यांनी केलं. लोक ऐकत नसल्यानं लॉकडाऊन वाढवण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

राज्य सरकारनं लोकांचे प्रश्न नीट सोडवण्यासाठी योग्य यंत्रणा लावली पाहिजे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोग्य खात्याकडे कमी लक्ष दिल्यामुळे ही परिस्थिती ओढावली असल्याचंही राज ठाकरे म्हणाले.