नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुठल्याही व्यक्ती किंवा समूहावर जंतुनाशक रसायनांची फवारणी करणं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धोकादायक असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी अशा प्रकारच्या फवारणीची शिफारस केली नसल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.