नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पथकाने आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत मुंबईतल्या धारावी भागाला भेट दिली. याठिकाणी असलेला ट्रांझिट कॅम्प, क्वारंटाईन सुविधेची पाहणी त्यांनी केली.
विलगीकरणाची सुविधा बाराशे खाटांवरून दोन हजार खाटांपर्यंत वाढवण्याची सूचना या पथकानं केल्याची माहिती टोपे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.