नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीरमध्ये  कुपवाडा जिल्ह्यात हंडवारा इथं आज पहाटे सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात  लष्कराचे दोन अधिकारी आणि राज्य पोलीस दलाचे तीन अधिकारी शहीद झाले.

देशाची सेवा करताना आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या या सुरक्षा अधिकाऱ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दहशतवाद्यांविरोधात लढताना सुरक्षारक्षकांनी दाखवलेलं शौर्य आणि त्यांचा त्याग देशवासीयांच्या सदैव स्मरणात राहील, असं संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी म्हटलं म्हटलं.