नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ४० लाख २३ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ३६ कोटी ८९ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १९ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात ४४ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २ कोटी ९८ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४३ हजार ३९३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, ९११ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ५ हजार ९३९ वर पोचली आहे. देशभरात सध्या ४ लाख ५८ हजार ७२७ रुग्ण उपचाराधीन आहेत.