नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यात टाळेबंदीच्या काळात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून  गरीब कुटुंबाना मदत केली जात असून, आतापर्यंत ७०० कुटुंबांच्या खात्यात एकूण ११ लाख ९५ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

येत्या १५ दिवसात आणखी  २ हजार ७०० कष्टकरी कुटुंबाना आर्थिक मदत करण्याचं स्वयंसेवी संस्थांचं लक्ष्य असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या  दशावतार ही लोककला  सादर करणाऱ्या कलाकारांवर  कोरोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेनेनं जिल्ह्यातल्या ४० दशावतार मंडळांना एकूण ५ लाख रुपयांचं आर्थिक  मदत केली आहे.