नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईच्या कांदिवली उपनगरात एका घराची भिंत कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली तर दोघांना किरकोळ दुखापत झाली.

लालजी पाड्यातल्या दीपज्योती चाळ या दोन मजली इमारतीची भिंत आज पहाटे कोसळली.mरहिवासी तेव्हा झोपले असल्यानं आत अडकून पडले. मात्र अग्निशमन दलानं अडकलेल्या सर्व १४ जणांना सुखरुप बाहेर काढलं.