नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधे अम्फान चक्रीवादळामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ८५ झाली आहे. हे चक्रीवादळ होऊन तीन दिवस झाल्यानंतरही परिस्थिती सुरळित करण्यात प्रशासन अपयशी ठरल्यामुळे आज कोलकात्यामधे विविध भागांत लोकांनी आंदोलन केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज  दक्षिण चोवीस परगाना जिल्ह्याला भेट देऊन पहाणी करण्याची शक्यता आहे.