नवी दिल्ली : कोविडनं आतापर्यंतमुंबई महानगर पालिकेच्या २५ कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आहे तर १५०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती जाहीर केली. पालिकेचे वैद्यकिय कर्मचारी कोरोनाच्या साथीत काम करत आहेतच.

निर्जंतुकीकरण, संपर्क शोध, झोपडपट्टयांमधल्या नागरीकांची चाचणी, याच बरोबर गरजूंना जेवण पुरवण्याची जबाबदारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे त्याना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.