नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमधला विश्वास वृद्धींगत करण्यासाठी सर्व संकल्पनांचे स्वागत भारत सरकार करत आहे, असे वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. त्यांनी रात्री लंडन येथे भारतीय समुदायाशी संवाद साधला.

भारतीय समुदायाने भारत आणि इंग्लंड दोघांसाठी योगदान दिले असून दोन्ही देशांमधले संबंध वृद्धींगत केले आहेत.

गोयल यांनी सरकारची धोरणे आणि उद्दिष्टे समजावून सांगितली.

आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात गोयल ब्रिटीश सरकारमधले नेते आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठीच्या पावलांवरही चर्चा होईल.

पेटंटची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत करण्याच्या कामाला गती देण्यासाठी मंत्रालय प्रयत्न करत असल्याचेही गोयल यांनी सांगितले.