नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाने राज्यातल्या कापूस उत्पादकांसाठी पाच हजार ७०० कोटी रुपये दिले परंतु कापूस उत्पादकांचा प्रश्न सोडविण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी  केला आहे. अमरावती इथं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. कोरोना संसर्गाच्या  वाढत्या प्रादुर्भावाचा यावेळी त्यांनी आढावा घेतला आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या.