नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे सुमारे १४ ते २९ लाख नागरिकांना विषाणू संसर्गापासून वाचवण्यात आलं; तसंच या काळात कोविडमुळे होणारे ३७ ते ७५ हजार संभाव्य मृत्यू रोखण्यात आले अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं राज्यसभेत दिली आहे.

टाळेबंदीचा हा चार महिन्यांचा कालावधी देशातली आरोग्य यंत्रणा बळकट करणं , आरोग्य क्षेत्रातलं मनुष्यबळ वाढवणं आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांचं उत्पादन देशातच करण्यासाठी उपयुक्त ठरला असल्याची माहिती;  केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.