मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल तीन हजार ७२६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १५ लाख १४ हजार ७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ पूर्णांक ९२ शतांश टक्के झालं आहे.

काल दिवसभरात आणखी पाच हजार ३६९ कोरोना बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ८३ हजार ७७५ झाली आहे. राज्यभरात काल ११३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४४ हजार २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातला मृत्यूदर २ पूर्णांक ६१ टक्के आहे. सध्या एक लाख २५ हजार १०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.