मुंबई : शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी राज्यातील जनतेला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा आनंद लुटत असताना केंद्र व राज्य शासन यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आनंदासह सुरक्षितता जपण्याचे आवाहनही केले आहे.

विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकी ज्ञानात न अडकता अवांतर वाचन करून आपले छंद जोपासले पाहिजेत. जिज्ञासुवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, महत्त्वाकांक्षा जागृत ठेवली पाहिजे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.