मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल पाच हजार ८६० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ७९ शतांश टक्के इतका आहे.

काल आणखी ५ हजार ५३५ कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख ६३ हजार ५५ झाली आहे. सध्या ७९ हजार ७३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल १५४ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४६ हजार ३५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.