मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांचे सत्यशोधक विचार, शेतकरी, बहुजन समाजाबद्दलचे त्यांचे धोरणंच राज्याला आणि देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाईल, अशा शब्दात पवार यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.

औरंगाबाद इथल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे.