नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या देशभरात आतापर्यंत १५ कोटी ६८ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. दररोज सुमारे १८ लाख २६ हजार जणांना लस टोचली जाते अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा कालपासून सुरु झाला असून ११ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या ८६ हजार २३ जणांनी काल लशीचा पहिला डोस घेतला. गुजरातमध्ये सर्वात जास्त ५१ हजार जणांनी लस घेतली तर उत्तर प्रदेशात १५ हजार लाभार्थ्यांना लशीचं कवच मिळालं.