नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही याबाबत सरकार येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती देशाचे महान्यायकर्ता के. वेणुगोपाल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी आता ३ जून रोजी घेतली जाणार आहे.