नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ईशान्य भारतातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधणार आहेत. दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीत आसाम, नागलँड, त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होतील. या राज्यांमधल्या कोरोना परिस्थितीचा मोदी आढावा घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह सचिवांनीही ईशान्य भारतातल्या राज्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत, या राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.