नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालिम्पिक क्रीडास्पर्धा आज सुरु होत आहे. या स्पर्धेची प्रमुख संकल्पना ‘आम्हाला पंख आहेत’ अशी आहे. या स्पर्धेत भारताचे ५४ खेळाडू, नेमबाजी, बॅडमिंटन, जलतरण, भारोत्तोलन अशा विविध क्रीडा प्रकारात सहभागी होत आहेत. यंदा प्रथमच पॅरालिम्पिक मध्ये भारताचे खेळाडू इतक्या मोठ्या संख्येनं भाग घेत आहेत. या स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्याचं प्रसारण आज संध्याकाळी चार वाजता डी डी स्पोर्टस या वाहिनीवरून केलं जाईल.