नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली अपंगत्वावर केंद्रीय सल्लागार मंडळाची तिसरी बैठक झाली.

दिव्यांग व्यक्तींचे अधिकार कायदा 2016 ची अंमलबजावणी सुगम्य भारत अभियान, दिव्यांगांसाठी विशेष ओळखपत्र यासारख्या महत्वाच्या मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.

दिव्यांग व्यक्तींचे अधिकार कायदा 2016 अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना नियम अधिसूचित करण्याचे आणि लवकरात लवकर राज्य सल्लागार मंडळे स्थापन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.