मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातून एकेक प्रकल्प चालले असून वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानं युवकांच्या हातून रोजगार निसटला, अशी टीका युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याजवळ वडगाव इथं जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

कोविड काळात महाविकास आघाडी सरकारनं गुंतवणूक आणली. युवकांच्या पाठीशी शिवसेना आहे, असं त्यांनी सांगितलं. वेदांत प्रकल्पासाठी तळेगावची जागा उत्तम होती. पूर्ण सवलती देऊनही प्रकल्प, घटनाबाह्य सरकारमुळे राज्याबाहेर गेला, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. या सरकारनं युवकांची स्वप्नं धुळीला मिळवली. या राज्यातल्या युवकांना रोजगार कधी मिळणार असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.