नाशिक : शेतकऱ्यांना सुवर्णकाळ आणण्यासाठी राज्यात सत्ता परिवर्तन करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि पिंपळगाव इथं त्यांनी प्रचार सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते.

भाजप शिवसेनायुतीचं सरकार शेतकरी विरोधी सरकार असून कांद्याची निर्यात बंद केल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली.