मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सरकार स्थापनेचा तिढा कायम असताना युतीतल्या इतर मित्रपक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली.

भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करावं यासाठी आपण राज्यपालांकडे निवेदन सादर केल्याची माहिती आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भेटीनंतर वार्ताहरांना दिली.

शिवसेना नेत्यांनी भाजपासोबतच्या सत्तास्थापनेचा आपला प्रश्न मार्गी लावावा, असं ते म्हणाले. शिवसेना उपमुख्यमंत्रीपदाची मागणी करु शकते, असं आठवले यांनी सांगितलं.