नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अँँन्टीग्वा इथं काल झालेल्या तिसऱ्या एकदविसीय क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघानं वेस्ट इंडिजच्या महिला संघावर ६ गडी राखून विजय मिळवला, आणि तीन सामन्यांची ही मालिका २-१ अशी जिंकली.

नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी स्वीकारणा-या वेस्ट इंडिजनं निर्धारित पन्नास षटकात सर्व बाद १९४ धावा केल्या. १५५ धावांचं विजयी लक्ष्य भारतानं ४७ चेंडू बाकी असतानाच पूर्ण केलं. स्मृती मानधनानं ६३ चेंडूत ७४ धावा केल्या.