मुंबई (वृत्तसंस्था) : वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय यासह सत्ताधारी भाजपाला आलेल्या कथित अपयशाचा निषेध करण्यासाठी, नाशिक शहर काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, चुकीच्या आर्थिक धोरणामुळे उद्योग बंद पडत असून त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे, असा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं.

माजी खासदार डॉ प्रतापराव वाघ, शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ हेमलता पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते.