मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपालांचा राज्याच्या मुख्यमंत्री शपथविधी प्रक्रियेचा निर्णय मनमानी असल्याचा सांगत त्या विरोधात याचिका शिवसेनेनं आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे, तेव्हा त्यांनाच सरकार स्थापनेची परवानगी द्यावी अशी मागणीही याचिकेत केली आहे.

भारत सरकार, राज्यसरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात ही रिट याचिका दाखल झाली आहे. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह याचिकाकर्ते आहेत. घोडेबाजार टाळण्यासाठी येत्या चोवीस तासाच्या आत सुनावणी घ्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.