नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी कर्मचाऱ्यांना 60 व्या वर्षी किंवा 33 वर्षांचा सेवा काळ पूर्ण केल्यावर सेवा निवृत्त करण्यासंबंधी  कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे.

लोकसभेत आज एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली.