नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरु असलेल्या 13व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धामधे भारतानं शंभरहून अधिक सुवर्ण पदकांसह दोनशेहून अधिक एकूण पदकांची कमाई केली आहे.

स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारत दोनशेहून अधिक पदकं मिळवत तालिकेत प्रथम स्थानी आहे. भारतानं आतापर्यंत 110 सुवर्णपदकं, 69 रौप्य आणि 35 कांस्य अशी  214 पदकं मिळवली आहेत.