नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला, आणि तीन सामन्याच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी साधली.

भारताने विजयासाठी दिलेल्या १७१ धावांचं आव्हान १८ षटकं आणि ३ चेंडूत दोन गडी गमावून पूर्ण केलं. लेंडन सिन्मसनं ४५ चेंडूत ६७ तर निकोलस पूरण यानं १८ चेंडूत ३८ धावा फटाकावून वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला. भारताकडून शिवम दुबेनं सर्वाधिक ५४ धावा केल्या.