मुंबई :  पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या(पीएमसी बँकेच्या) खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी दिले.

पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या खातेदारांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी खातेदारांचे म्हणणे ऐकून घेतले आणि कार्यवाहीबद्दल आश्वस्त केले.