मुंबई (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल इथलं नियोजित स्मारक दोन वर्षांत पूर्ण उभारलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. इंदू मिल परिसराची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

बांधकामासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर पुढच्या दोन वर्षांत १४ एप्रिल २०२२ पर्यंत स्मारक उभारण्याचं काम पूर्ण केलं जाईल, स्मारक उभारणीला काहीही अडचण येणार नाही, असं पवार यांनी सांगितलं.