नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा मिळवण्यासाठी, तसंच लोकांना या कायद्याविषयी माहिती देऊन या कायद्याविषयी पसरवण्यात आलेले गैरसमज दूर करण्यासाठी भाजपाची दहा दिवसांची देशव्यापी सामूहिक जनसंपर्क मोहीम कालपासून सुरू झाली.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीतल्या लाजपत नगर इथं सुरु असलेल्या मोहीमेत सहभाग घेतला. मिस्ड कॉल देऊन या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी भाजपानं ८८६६२८८६६२ हा टोल फ्री क्रमांकही सुरु केला आहे. ही मोहीम १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.