नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि आम पक्ष, जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत, मुस्तफाबाद इथं झालेल्या रॅली दरम्यान केला. या प्रश्नावरुन हे दोन्ही पक्ष जनतेला भडकवत आहेत, अशी टीका त्यांनी केली. विकासाच्या बाबतीत, ‘आप’नं दिल्लीला १० वर्ष मागे नेलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दिल्लीतल्या एक हजार ७३१ अनाधिकृत वसाहतीत राहणार्‍या ४० लाख रहिवाशांना मालकी हक्क दिला, असं ते म्हणाले. येत्या पाच वर्षात, भाजपा, प्रत्येक झोपडीधारकाला पक्कं घर देईल, असं आश्वासनही शहा यांनी दिलं.