मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

महाराष्ट्राच्या नाविक दल वारशाचा इतिहास सांगणारा चित्ररथ यंदा प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या संचलनात सहभागी होणार आहे.

“कान्होजी आंग्रे-स्वराज्याचा पहिला सरखेल” या विषयावर हा चित्ररथ साकारण्यात येणार आहे.

“अश्वदल त्यांची पृथ्वी आणि आरमार त्यांचा समुद्र” हे लक्षात घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी प्रथम आरमार उभारलं, या आरमार उभारणीत अनेक वीरांनी योगदान दिलं त्यापैकी एक म्हणजे कान्होजी आंग्रे त्यांची शौर्यगाथा या चित्ररथात उलगडली जाणार आहे.