मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात खानापूर इथल्या एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला पोलीसांनी काल रात्री म्हाळादेवी इथे अटक केली.

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे. या आरोपीच्या एका साथीदाराचा शोध सुरु असल्याचेही पोलीसांनी सांगितले.

हा आरोपी बोकड चोरण्याच्या उद्देशाने पिडीत महिलेच्या घरात शिरला होता, मात्र त्यानंतर त्याने महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.