नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतले सिद्धीविनायक मंदिर, मुंबादेवी मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर यासारख्या देवस्थानांनी मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथं श्री सप्तशृंगी देवीची चैत्रोत्सवातील यात्रा रद्द करण्यात आली आहे.

पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं तुकाराम भवनात भाविकांना केलं जाणारं प्रसाद वाटप बदं करायचा निर्णय समितीनं घेतला आहे. मात्र तुकाराम भवनाच्या बाहेर खिडकीतून प्रसाद वाटप होणार आहे.

हजयात्रा मात्र ठरल्याप्रमाणे चार ऑगस्टपासून सुरू होणार आहे. काहीजण अफवा पसरवत असले तरीही त्यावर विश्वास ठेवू नये. ज्यांना अजूनही नोंदणी करायची असेल त्यांनी ती करावी, असं आवाहन महाराष्ट्र राज्य हज यात्रा समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी आज  केलं.