नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं राज्यातल्या ३० रुग्णालयांना फक्त कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी चिन्हांकित केलं आहे.

या सर्व रुग्णालयांमध्ये २ हजार ३०५ खाटांची व्यवस्था केली असून तिथं फक्त कोरोना बाधितांचाच उपचार केला जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. या बाबतची अधिसूचना जाहिर केली असल्याची माहिती त्यांनी दिली.