नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी घातलेले निर्बंध १४ एप्रिल नंतर टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्याबाबत सरकार विचार करत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
लोकांनी शिस्त पाळली नाही तर लॉकडाऊन वाढवावा लागेल, असं टोपे यांनी आधी सांगितलं होतं. मात्र आजाराचा प्रसार जास्त असलेले भाग वगळता इतर ठिकाणी निर्बंध शिथिल करता येतील, असं त्यानी नंतर स्पष्ट केलं.