नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचा संसर्ग झालेले नवे २ हजार २९३ रुग्ण सापडले, तर ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. आता देशभरातली एकूण रुग्णसंख्या  ३७ हजार ३३६ झाली आहे. आतापर्यंत देशभरात १ हजार २१८ जणांचा मृत्यू कोविड १९ ने झाला असून त्यातले ६६ मृत्यू गेल्या २४ तासात झाले. ९ हजार ९५० रुग्णांनी आजारावर मात केली आहे.

राज्यात काल एका दिवसात सर्वात जास्त, १००८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यात रुग्णांची संख्या ११ हजार ५०६ झाली आहे. या आजारानं काल राज्यात २६ जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबळींची संख्या आता ४८५ झाली आहे. तर, आतापर्यंत एक हजार ८७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.