नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयानं, आयुर्वेदीय औषधी काढा देण्याचा उपक्रम हाती घेतलाय.

याचा लाभ कोल्हापूर जिल्हयातील ११ लाख ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. तसंच काही नागरिकांसाठी होमिओपॅथीच्या  गोळयांचा १० ते १४ दिवसांचा कोर्ससुध्दा सुरू करण्यात आला.