नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचे वृत्त फेटाळले आहे. असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

देशभरात अजूनही सर्व शैक्षणिक संस्था उघडण्यास मनाई आहे. पत्र सूचना कार्यालयाने ह्या बातमीची शहानिशा करून हि माहिती दिली आहे.