मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सरकारी पत्रव्यवहारांमध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव याचं संकेत चिन्ह वापरण्यासंबंधी निर्देशांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना, राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागांना दिल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, पुढील ७५ आठवडे, अर्थात पुढील वर्षाच्या १५ ऑगस्ट पर्यंत ७५ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.