मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई किना-यापासून जवळ समुद्रात आपदग्रस्त झालेल्या वैष्णोदेवी माता या मच्छिमार नौकेवरुन 17 मच्छिमारांची सुखरुप सुटका भारतीय नौदलाच्या तेज जहाजानं केली आहे.

या नौकेचं इंजिन बिघडल्यामुळे तिच्यात पाणी शिरु लागलं, तेव्हा नौदलानं ही कारवाई केली. बोटीवरचे सर्वजण सुखरुप असून, त्यांना दुखापत झालेली नाही, असं नौदल सूत्रांनी सांगितलं.