नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युद्धबंदीचं पुन्हा एकदा  उंल्लघन करत पाकिस्तानने आज भारतीय सुरक्षा चौक्या तसंच नागरी भागावर अंदाधुंद गोळीबार केला.

पूंछ जवळ दुपारी तीनच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला तसंच उखळी तोफांचा मारा केला.

भारतीय सैन्यानं याला ठोस प्रत्युत्तर दिलं. शेवटची बातमी आली तेव्हा चकमक सुरू होती.