नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी  शिवसेनेनं काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापन न करता भाजपसोबत सरकार स्थापन करावं, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं.

शिवशक्ती भीमशक्तीमुळेच राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना भाजप महायुतीचं सरकार आलं. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडून द्यावा आणि उपमुख्यमंत्री पद घेऊन एकत्र सरकार चालवावं. मुख्यमंत्रीपदाचा शिवसेनेचा फार आग्रह असल्यास भाजपनं एक वर्षासाठी मुख्यमंत्री पद शिवसेनेला देऊन तडजोड करावी, असं आवाहन आठवले यांनी केलं.