नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं १४ पदकं मिळवली असून यात ३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

नेपाळच्या पोखरा इथं झालेल्या ट्रायथालॉन मधे भारतानं पहिलं सुवर्णपदक मिळवलं. बिश्वजित श्रोखोम नं रौप्य तर सरोजनी देवी आणि यांनी महिलांच्या गटात अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं.