नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत काल झालेल्या आगदुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ४३ जणांना राज्यसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

ही घटना दुदैवी आणि वेदनादायक असल्याचं मत उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी यावेळी व्यक्त केलं. राज्यसभेत दोन मिनिटं मौन पाळून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.